1) जय लहुजी जय भीम मित्रहो गेल्या दोन-तीन महिन्याखाली मातंग समाजाचा इतिहास Honest talk या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता त्यावर आपला खूप चांगला प्रतिसाद राहिला. याच कारणास्तव अजून असे व्हिडिओ बनवावेत जेणेकरून आपण ज्या समाजाचं खातो त्या समाजाची सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्यच असतं. म्हणून हा आणखी एक प्रयत्न! मित्रहो आपण सर्वांना वीर फकीरा तर माहीतच आहे तो वीर मातंग समाजासाठी, समाजातील तरुण फकीरा ज्याने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या राजवटीविरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर गावातील सावकारशाही,सरंजामशाही विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्याच्या कित्येक वर्ष अगोदर बंड पुकारले. आणि त्याने खऱ्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा या मातंग समाजासाठी रचली . त्याने तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, निरक्षरता, गरिबी आणि जातीय भेदभावावर प्रहार केला.
2 ) आणि मित्रहो मी पुन्हा सांगत आहे की या सर्व घटना अठराव्या शतकातील आहेत. स्वातंत्रपूर्व काळातील जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. त्याच्यात विशेष म्हणजे देशात इंग्रजांची जुलमी राजवट होती, त्याचबरोबर थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाही नव्हती. कारण हा काळ खूप पूर्वीचा आहे .आणि या सर्व घटनांच्या अगोदरचा काळ आहे. मग विचार करा मित्रांनो त्या काळात तशी सभोवताली सर्व परिस्थिती असताना देखील, फकीराने आपल्या समाजातील लोकांचे कल्याण करण्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि जातीयता व जातीय वादाविरुद्ध अथक पणे संघर्ष केला. त्याने आपले जीवन केवळ स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि अन्यायविरुद्ध लढण्यासाठी अर्पण केले. त्याचा तो संघर्षवादी, वास्तववादी लढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केला आहे. कारण हा फकीरा मातंग समाजातील धाडसी आणि शूरवीराचे प्रतीक आहे आणि अशाच अनेक धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे त्या काळचा जुना मातंग समाज हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समुदाय होता. त्या फकीराने मातंग समाजाच्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे प्रतिनिधित्व केले. 3 )आणि म्हणूनच त्या फकीराचा संघर्ष आजही मातंग समाजाला आणि समाजातील माझ्यासारख्या तरुणांना अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. आणि मित्रहो फक्त फकीरानच नव्हे तर मातंग जातीत जन्मलेले रानोजी, फकीरा,सावळा आणि एकूण एक असे अनेक धाडसी शूरवीर आजही आम्हास प्रेरणा देतात. परंतु मित्रहो, खेद एका गोष्टीचा वाटतो की आपण मातंग समाजाच्या राजकीय,सामाजिक, आणि आर्थिक संघर्षाचे तत्त्वज्ञान बिलकुल नीटपणे समजून घेत नाही. मित्रहो हा सर्व गौरवशाली इतिहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्यासाठी आणि आपल्या पिढ्यांच्या भविष्यासाठी लिहून ठेवलेला आहे. पण खंत एवढी आहे की आपण त्याचा कधी विचार करत नाही. आणि त्याहूनही पुढे जाऊन आणखी एक मोठी दुर्दशा म्हणजे अण्णाभाऊ हे मातंग जातीचे असल्यामुळे इतर जातींना हे तत्त्वज्ञान समजून घेण्यात फारसं स्वारस्य वाटत नाहि. 4 ) मित्रहो मांग समाजाचे शिक्षणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. परंतु अशा ऐतिहासिक गौरवशाली इतिहासाच्या पुस्तकांवर मात्र मातंग समाजातील युवक आणि माणसे दुर्लक्ष करताना दिसतात. आणि या विषयांवर शिकलेल्या पोरांना बोलण्यात इंटरेस्ट नाही. कारण या मातंग समाजातील शिकला सवरलेला वर्ग अशा बाबींवर वेळ न घालवता, पगार,सरकारी नोकरी आणि आईत खाऊ भत्ते, त्याचप्रमाणे जवळचे नातेवाईक, यापलीकडे जग मानायला तयार नाही. म्हणूनच हा समाज कंदुरी, नवसं, वाढदिवस आणि अगदी किरकोळ घरगुती समारंभ यात दिवसेंदिवस गुंतत चाललेला आहे. मिळणाऱ्या पैशातून पुस्तके विकत घेण्याची अक्कल अजूनही या समाजात आलेली नाही. पण त्याही पलीकडे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यात कपाट, पलंग, फ्रिज, कुलर, एसी, टीव्ही अशा अनेक दिखाव्याच्या वस्तू देऊन श्रीमंतीचा आव मात्र आणला जातो 5 ) आणि म्हणूनच या मातंग समाजातील माणसांच्या आत्ममग्न प्रवृत्तींमुळे मातंग समाजाला सरकारी नोकरी आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळून देखील त्याचा उपयोग समाजाला किंवा समाजाचं भलं करणाऱ्या कोणत्याही चळवळीला होताना दिसत नाही. समाज जाऊ खड्ड्यात पण स्वतःला काय मिळतं यावर या समाजातील बहुतांश लोकांचा भर आहे. म्हणूनच आजच्या मातंग समाजाने त्या फकिराचा त्याग, त्याचे बलिदान याचे चिंतन करून स्वतःमध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे. फकीरासारखा एक शूर, प्रामाणिक, धाडसी योद्धा समाजासाठी संघर्ष करीत असताना, आपल्या रक्ताचे थेंब अर्पित करीत असताना देखील, दुलारी मांगासारखा एक मांग फकीरा सोबतच गद्दारी करतो . अशा दुलारी गद्दार मांगाची देखील आज या समाजात बडतच झालेली दिसते. या अशा आपल्या समाजातील व्यसनी, लालची आणि गद्दार माणसांना आपला देश, आपला समाज यांच्याशी काहीही घेणं देणं नसत. 6 ) सत्ता पदासाठी आणि थोड्याशा लाभासाठी लाळ घोटणारी ही माणसं कुठल्याही थराला पोहोचतात. अशी माणसे समाजातील नीतिमान लोकांचा सर्वनाश करण्यातच धन्यता मानतात . आणि एकमेकांचे पाय ओढण्यातच हे सडलेल्या डबक्यातील बेडका प्रमाणे पटाईत असतात. ज्या बहादुर मांगांना मांग समाजाचं भलं व्हावं असं वाटतं, वाघासारखं जगावसं वाटतं, त्याला फकीराच्या विचारांशिवाय पर्याय नाही. कारण फकिराचा विचार गुलामगिरी संपवणारा आहे. शोषितांच्या न्यायासाठी पुकारलेला यलगार आहे. जिथे भूक तिथं फकीरा, जिथे जुलमी कायदा तिथे बंड. 7 ) त्याकाळी इंग्रजांच्या जुलमी कायद्यानं मांग जातीला हद्दपारी दिली. मांग जातीला दिवसातून तीन वेळा हजेरी लावून अतोनात शोषण केलं, छळ केला, मांगांना गावातून पळवून लावलं, लाखो मांग आपली मांग नावाची ओळख पुसून भटके बनले. वाटदिसेल तिकडं पळून गेले, बाहेरच्या प्रांतात जावून जात व भाषा, तसेच नाव बदलून राहू लागले. इंग्रजांनी मांग जातीला शिकू दिले नाही. गुन्हेगार जमातीचा शिक्का भाळी मारुन हजारो मांगांना वनवास दिला. मांग हा 'लायक' असूच शकत नाही असा नियम झाला. 'लायकी' हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगाना गावापासून, घरापासून,
Информация по комментариям в разработке