प्रिय शेतकरी मित्र,
आज डाळिंब प्लाट भेट प्रसंगी श्री सुप्पड सिंह नयमाने,गाव: भिंगी बोरसर,तालुका : वैजापूर,छ संभाजी नगर,झाड संख्या - ५००,२ रा बहर,पानगळ दिनाक २७ डिसेंबर २०२५ व पहिले पाणी १ जानेवारी २०२६!
डाळिंब या पिकात आंबिया बहर व्यवस्थापन खर्या अर्थाने सुरुवात ही झाली आहे असे चित्र सर्वत्र महाराष्ट्र मधे दिसून येत आहे,श्री सुप्पड भाऊ यांचा संपर्क हा श्री शेकू भाऊ सोनवणे(डाळिंब तज्ञ,अनुभवी व आपले खास मित्र) यांच्या माध्यमातून झाल्यानंतर मागील २ महिन्यांपासून रेस्ट बहर वेळापत्रक तसेच पानगळ केल्यावर नंतरचे वेळापत्रक हे तंतोतंत पाळले असल्याने डाळिंब प्लाट मधे दिवस प्रमाणे स्टेज या दिसायला सुरवात झाली आहे आपण ते वीडियो मधे नक्की बघू शकतात.
चालू वर्षी अर्ली आंबिया बहर मधे जे शेतकरी बांधव हे पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पानगळी या घेतल्या गेल्या आहेत त्यांना ढगाळ वातावरणाचा सामना हा जास्त कराव लागल्याने,तेथे काही प्रमाणात डाळिंब बांधावन मधे नाराजी ही दिसून येते आहे……आपले ट्रीटमेंट चे सर्वच प्लाट हे यशस्वी आहेत असे नसून ३/४/११/१४ डिसेंबर चे डाळिंब प्लाट हे आता कुठे चांगल्या पेकी फुले ही टाकत असून…….आता पर्यंत त्या प्लॉटन ६० दिवस प्लस हे झाल्याने चिंतेचे कारण हे बनले आहेत……..अश्या वेळीस आपण हिम्मत न हरत अखंड प्रयत्न हे चालू ठेवावे,नक्की यश हे मिळेल……इतकेच आहे थोडा खर्च वाढेन पण परत पानगळ किवा संपूर्ण शूट काढून नवीन फुल निघेन या दृष्टिभावात न जाता,आपले फूल निघण्यासाठी योग्य फवारण्या व ठिबक मधून लिक्विड/स्लरी ही चालू ठेवणे हे गरजेचे आहे व डाळिंब पिकातील प्रॅक्टिस हे फॉलो अप करणे हे गरजेचे आहे.
फ्लॉवरिंग स्टेज मधे मागील २ दिवस पासून तापमान व कोरडे/उष्ण हवामान हे वाढ झाले असून,पाणी वाढ करून वाफसा निर्मिती करणे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे……नाहीतर पाणी वर पाणी हे आपल्याला बुरशीमय रोग मधे झाड बळी पडू शकते या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे.
आजकाल डाळिंब या पिकात प्रत्येक शेतकरीनी डॉक्टर किवा कृषी सल्लागार हे लावले आहेत,जो तो आपला रिझल्ट्स दाखवणार आहे शेवटी स्पर्धा आहे……पण आपण स्वतः एक शेतकरी ही असल्याने आपण डाळिंब हे पिक स्वत शिकणे व यश संपादित करणे हे गरजेचे आहे असे मला जाणवते……बेसिक गोष्टी व अवस्था माहिती असणे हे गरजेचे आहे…..जर आपल्याला सल्ला देत नसून,अनुभव घेणे व समजून घेणे हे खूप महत्वपूर्ण आहे.
वरील श्री बायो कडून आपण वेगवेगळ्या भागात डाळिंब प्लाट किवा इतर सर्वच पिकावर काम करत असताना प्रोडक्ट चे रिझल्ट्स अत्यंत वेळेवर मिळत असल्यान,आपल्या डाळिंब उत्पादकामध्ये समाधान ची भावना व्यक्त होत असताना दिसते…….आपण जे प्रोडक्ट आज मार्केटिंग ल हातात हे घेतले आहेत आज तीच उत्पादने वालग्रो इंडिया(सिंगेंटा बायोलॉजिकल्स)ही मार्किट मधे विकत असताना आपण बघू शकतो कारण ते उत्पादने श्री बायो नेच दिलेले आहेत,त्यामुळे कोणतीही प्रोडक्ट किवा सर्व्हिसेस मधे फसवणूक नसून प्रत्येक प्रोडक्ट चे हे रिझल्टसच दिसून येत आहेत हे आपण मागील १ वर्षांपासून फील्ड वर वेगवेगळ्या वीडियो मधून सांगण्याचा प्रयत्न असून,आपण वापर करावा व रिझल्ट्स हे घ्यावेत तसेच जैविक प्रॉडक्ट्स हे जैव शास्त्र मधे मॉलेक्युलर बायोटेकॉनोलॉजी बेस ही उत्पादने असून,रिझल्ट्स हे ३६ ते ४८ तासात दिसतील……आपण स्वत नामांकित जैविक कंपनी मधे मागील १५ वर्षापासून काम करत असताना,नावीन्यपूर्ण जैविक मधे इतके फ़ास्ट रिझल्ट्स देणारी एकमेव कंपनी श्री बायो आहे भारतात हे स्पष्ट होते…..आपण कोणत्याही दुसऱ्या कंपनीचे नाव घेऊन ते वाईट आहेत किवा रिझल्ट्स हे कमी आहेत किवा नाही आहेत असा कोणताही दुजाभाव किवा द्वेष भाव नाही मनात!
डाळिंब या पिकात आरंभशूर शेतकरी हे भरपूर असतात,पण मध्यस्थ मधे हिंमत कचरून जाते….असे काही प्लाट भेट घेतल्यावर दिसून येते,आपण जे अंतकरणात जे विचार किवा भावना हे ठेवणार आहेत ते बाह्य दृष्टिभावात दिसेन……प्रामाणिक प्रयत्न हे करत राहावे,नक्की यश हे मिळेन प्रकृतीच्या मदतीने,बाकी काय सांगू आपल्या अजून! सयंम ढळू न देता योग्य वेळेस योग्य स्टेज च्या हिशोबाने आपण सर्वांनी काम अथक करत राहावे,भगवंत नक्की आपल्या सहायला उतरेल या गोष्टीवर १००% निष्ठा असावी असे मला यामधून सूचित करणे आहे.
वरील लेख व वीडियो आपण नक्की बघावा ३६/३८ दिवसात जानेवारी महिन्यातील पाणी असल्याने,वातावरणाची साथ व योग्य उत्पादने वापर केल्याने नक्की अपेक्षित स्टेज वरील प्लाट मधे दिसून येईल.
आपला कृषी मित्र,
शामकांत महाजन
श्री बायो एस्थेटिक्स,हैदराबाद
छ संभाजी नगर
82755 06166!!!
Информация по комментариям в разработке