गण गौळण | Famous naman in Ratnagiri | हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवळी 😍 #naman #trending
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी,चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ.विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. याच कलेचे दुसारे रुप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते. त्याला “दशावतार” या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आणि वैधर्म्य आहे.
याबाबतची कथा अशी की,अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिध्द पावला. तर नमन उतर कोकणात होऊ लागला. नृत्य, नाट्य, संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार “यक्षगान” या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो. उत्सव प्रिय कोकणात सण, समारंभ म्हटले की मन उचंबळून आल्याखेरीज राहत नाही. प्रामुख्याने सणवारीत, लग्नसमारंभात, सार्वजनिक महोत्सव इ.मध्ये कोकणी संस्कृतीतील विविध लोककला आणि लोकनृत्य पहायला मिळतात. जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कोठेही असला तरी या उत्सवासाठी तो आपल्या गावाकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही. कोकणात या उत्सवात “कुणबी” समाजाची लोककला व लोकनृत्य या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे. होती व असेलच. लग्नकार्यात कोकणची लोककला नमन, दशावतार, तमाशा तर गणपती उत्सवात जाकडीनृत्य, काटखेळ, टिप-या, फुगड्या ही लोकनृत्य पहावयास मिळतात. लोककला व लोकनृत्य यातून प्राचीन कोकणच्या संस्कृतीचे जतन आपोआपच होत आहे. यापुढे ही या लोककलांचे जतन होणे काळाची गरज आहे. कोकणचे खेळे-नमन ही लोककला पूर्वी वीज नसताना पेट्रोमँक्सच्या प्रकाशात रंगायची. आज मात्र ही कला हँलोजनच्या रंगीबेरंगी दुनियेत रंगताना दिसते. काळ बदलला मात्र ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच आहेत.
Информация по комментариям в разработке