मातंग समाजाला राजकीय न्याय देणार - मा.ना.राजेशभैय्या टोपे

Описание к видео मातंग समाजाला राजकीय न्याय देणार - मा.ना.राजेशभैय्या टोपे

#Rajesh_tope_with_Chandrakant_Karke_&_Matang_samaj

मातंग समाजाला राजकीय न्याय मिळवून देणार - मा.ना. राजेश भैय्या टोपे
@ विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी. Date : 1/8/2022
------------------------------
अंबड / प्रतिनिधी : कोर्ट रोड स्थित अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती समाज भूषण पुरस्कार, गुणवंताचा सत्कार, व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर सायंकाळी साठे नगरातून अण्णाभाऊं साठे यांची प्रतिमा रथात ठेवून डीजेच्या तालावर अंबड शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मा.ना. राजेश भैय्या टोपे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे साहित्यिक असून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम केले ते लेखक तर होतेच त्याच बरोबर शिवशाहीर, गिरणी कामगारांचे नेते देखील होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे. या थोर महापुरुषांचे साहित्य समाजाने वाचले पाहिजे. मातंग समाजाला क्रांतीगुरु लहुजी साळवे आणि अण्णाभाऊंचा मोठा वारसा आहे तेव्हा येणाऱ्या काळात समाजाने प्रमाणिकपणे काम करावे मातंग समाजाला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असेल असे शेवटी श्री. टोपे म्हणाले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून संजय इंचे, NCPचे शहराध्यक्ष अफरोज पठाण, प्रमोद कांबळे, अर्जुन भोजने, काकासाहेब कटारे, सतिष देशपांडे, संदीप खरात, चंद्रकांत दिलपाक, एड विद्यासागर डावणगावकर, प्राचार्य पंडित,श्री.बुंदिलखंडे, सतिष खरात, ल.मा.खरात,प्रकाश नारायणकर, नाजीम शेख, मुन्ना खरात, मोहसीन हाश्मी, निलकंठ सुरंगे, गणेश पाऊबुदे, अशोक साळवे, गोपी घायाळ, महेंद्र खरात, राहुल खरात, गणेश पाचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भारत जाधव, रवींद्र कारके, शिवाजी घुले, विठ्ठल तुपसौंदर, अंबादास जाधव, सुनील खुळे यांना राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वहि-पेन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तर सायंकाळी साठे नगरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केले तर आभार मंगेश कारके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद शिरगोळे, कार्याध्यक्ष राहुल कारके, उपाध्यक्ष राजू जाधव, अनिल खुळे, साळीकराम बाळश्राप, लक्ष्मण उघडे, दिपक पिसूळे, भीमराव तांबे, शाम साळवे तर सचिव विशाल पवार, महेश जाधव, प्रमोद कारके, निलेश जाधव, रायभान सुतार, आदित्य कारके, किशोर कारके, ईश्वर जाधव, अभिजीत शिरगोळे, संघर्ष कांबळे, सचिन सुतार, दिशांत कांबळे, संजय निर्मळ, सुखानंद निर्मळ, रमेश सोनवणे, विलास तांबे, भगवान जाधव आदींनी प्रयत्न केले.

Комментарии

Информация по комментариям в разработке