Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५

  • Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
  • 2025-03-26
  • 72
माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५
  • ok logo

Скачать माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५

माननीय विधिमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ | मुंबई

भारतीय राज्यघटना स्वीकारली त्यास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने घडविलेल्या चर्चेत विधीमंडळ नेते व आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी सहभाग घेतला. 'आम्ही भारताचे लोक...' या तीन शब्दांनी सुरू होत असलेल्या संविधानाची आपली मोठी ताकद आहे. आपला देश हा विविध जाती, जमाती, धर्म, पंथ, लिंग अशा विविध घटकांमध्ये विखुरलेला होता. संविधानातील 'आम्ही' या शब्दाने आपल्याला एकसंध केले. 'भारताचे' या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला आपली ओळख मिळाली, जगभरात आपण 'भारतीय' म्हणून ओळखले जाऊ लागलो आणि लोक या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला लोकशाही मिळाली.

भारतात लोकशाही आतापर्यंत भक्कम आणि अभेद्य राहिली. मात्र रात्र वैऱ्याची आहे हे उगाच म्हणत नाहीत. आज संविधानाच्या मूळ गाभ्यालाच उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली जात आहे. आज राजकीय सत्तेसाठी आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता संपवण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. धर्मा-धर्मात द्वेष निर्माण केला जात आहे, जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. पूर्णतः द्वेषाचे वातावरण पसरवले जात आहे. हे प्रकार आपल्याला थांबवणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष राज्य अबाधित राहणे महत्त्वाचे आहे.

संविधानाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा अधिकार मिळाला तो मतदानाचा. श्रीमंत असो वा गरीब, हिंदू असो वा मुस्लिम, स्त्री असो वा पुरुष, संविधानाने प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आहे. या मताची मोठी ताकद आहे. पण निवडणुकांच्या दोन महिन्यांआधी डीटीबी योजना सुरू करून एकप्रकारे लोकांची मते विकत घेतली जात आहेत. तसेच मतदार यादीत घोळ केला जात आहे. येणाऱ्या काळात पारदर्शक निवडणुका घेणे मोठे जिकिरीचे काम तर होईलच, पण योग्य उमेदवारही जनतेचे न्यायालय असणाऱ्या सभागृहात पोहोचू शकणार नाही. मग लोकांनाच आपल्या हक्कांसाठी, मागण्यांसाठी दाद मागता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षांना विश्वासात घेत, मानसन्मान देत राज्याचा कारभार हाकतील असा विश्वास होता. पण याही अधिवेशनात राज्याचा विरोधी पक्षनेता नियुक्त केला गेला नाही. सभागृहाला विरोधी पक्षनेताच नसेल तर हे न्याय्य आहे का?

विरोधी पक्षनेते पदासाठी किमान १० टक्के सदस्य निवडून येणे गरजेचे असे फसवे दावे केले जातात, मात्र यात काही तथ्य नाही. हा फेक नरेटिव्ह आहे. विरोधी पक्षाला समान दर्जाची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेला तडा जाता कामा नये याची काळजी घेतली गेली तर आणि तरच संविधानाचे रक्षण होईल.

भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय समाजाला एक महत्त्वाचा इशारा दिला होता की, "राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही."

आता आपली जबाबदारी आहे, हा झेंडा सुखरूप पुढच्या पिढीकडे सोपवण्याची. त्यामुळे या देशातील तरुण पिढीवर आता महत्त्वाची जबाबदारी आहे. आपल्या देशातील शांतता, सहिष्णूता, संस्कृती, विचारधारा कायम रहावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, अशी मांडणी करत विधीमंडळ नेते श्री. जयंतराव पाटील यांनी सभागृहाला आपल्या उदात्त संविधानिक परंपरेची जाणीव करून दिली.

#BudgetSession #BudgetSession2025   #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #jayantpatil

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]